Thursday 9 June 2016

वाशाडी मामा



नावं जरी इचित्र वाटला तरी आम्ही तेंका वाशाडीमामाच म्हणत होतो. ते सदान कदा ‘वाशाडी पडो व्हरान’ असाच म्हणत.

७०रीच्या आसपास, अंगान सडपातळ. आंगार कळकट-मळकट धोतार, कपाळावर फाटको पंचो गुंडाळलेलो, हातात काठी (तेचो उपयोग होयो तसो करुक गावता, कधी झाडावरची फळा काडुक, तर कधी पायाखालचा जनावर मारुक) असो तेंचो पेहेराव.

चिलिम ओढूची तेंका सवय होती. ते चिलिम ओढूक लागले का आम्ही सगळी चिल्ली-पिल्ली तेंच्या भोवती घोळको करून बघत असाव. ते चिलिम ओढूक लागले का घुड घुड आवाज येय, तेची आमका लय मजा वाटा.

आम्ही न्हान असल्याकारणात त्यांची जास्त माहिती आमका नाय. ते खयचे? त्यांचे नातेवाईक कोण? आमका कायच म्हायत नाय. आमच्याकडे ते सगळ्या कामाक होते. घराची साफसफाईपासून ते ढोरांची राखणीकरीपर्यंत, कधीतरी काय व्हाया नको ते आणणा, बागात पाणी लावणा सगळा ते बघत. सगळी कामा ते आपलीच समजान करीत. बरेच वर्षा ते आमच्याकडे होते.

आमच्या लहानपणी घरात राबतो खूप होतो. येणाऱ्या-जाणार्यांची खळतीच नाय. तेव्हा याकच हॉस्पिटल होतो. लोका गाव-गावातसुन(लांबासून) औषध उपचारासाठी वेंगुर्ल्यात येत. पेशंट हॉस्पिटलात आणि त्याचं सोबती आमच्याकडे. लांबची आणि बरेच दिवस ऱ्हवनारी असली तर तेंची जेवणा खाण्याची सोय मग व्हायनार व्हय. तेंका एक स्टोव्ह ,थोडी भांडी देवाची लागत. थोड्या दिवसा साठी असलो तर घरचाच जेवान.

अशी माणसा इली की मामांच्या कपाळावर आटयो पडत. जसो काय मीच ह्या घरचो करतो-सावरतो आसय अशा रुबाबात ते वावरत. वाशाडी रे पडो असो सूर लायत.

आम्ही सगळी पोरा टोरा रात्री झोपताना मामांका गोष्टी सांगूक लाव. तेंच्ये गोष्टी म्हणजे भूता-खेतांचे जास्ती. ते गोष्टी अगदी रंगवत सांगित. भुताची गोष्ट सांगूक लागले का आम्ही अगदी घोळको करून बसाव. मधी बसण्यासाठी प्रयत्न करू, कारण सगळीच भूताक भिया होती. भूतान माका धरल्यान तर......गोष्ट संपली कि सगळ्यांका एक नंबरसाठी जावक तर व्हयाच पण खळ्यात जावची भीती. तेव्हा न्हाणीघर नाय,त्यामुळे भायरच जावन बसाचा लागा. एकटा जावचा धाडस कोणाकडेच नाय. मग सगळे मिळान एकमेकांच्या सोबतीत व्हायर जाव. मान खाली घालून भीत भीतच कार्यभाग आटपून पटकन घरात येव. मामा आमच्या सोबत येयत. तोंडात देवाचा नाव घेवन पटापट सगळी पोरा आपापल्या अंथरुणात कपाळावर पांघरून घेवन गप गुमान झोपाक जाव, झोपाक सुद्धा मधी जागा शोधून झोपाचो प्रयत्न करू.

एकदा तर मामांनी आमच्याच आमच्याच बागातली घडलेली भुताची गोष्ट सांगीतल्यांनी.

गावात प्रत्येकाची(बहुदा) माडाची-पोफळीची बाग आसता. तेका पाणी लावायचा असता. गावात पाटाचा पाणी मे महिन्यात सोडतत, तर प्रत्येकानं बांध फोडून आपल्या बागात घेवचा असता. रात्रीच्या येळाक नायतर फाटेक पाणी इला तर ता घेवन बागात सोडूचा असता, ह्या काम मामाच करीत. हातात कंदील आणि काठी घेवन ते एक-एक बांध फोडून पाणी लाय होते. तितक्यात बागाच्या दुसऱ्या टोकाक ओहोळा कडसून दोन बायका येताना मामांका दिसल्यो. मामांचे पाय लटपटाक लागले. तेनी कंदील खाली ठेवलेलो तो घेवक ते पुढे गेले पण त्यांच्यातल्या एका बाईने तो कंदील उचाल्यान, मामांची पाचावर धारण बसली, ते गाळी घालूक लागले. मधीच देवाचा नाव घेयत. देवांका भूता भियातात असा लोक म्हणतत. तेंची चापलाव बाजूक काडून ठेवलेली तीव खय नायशी झाली. थोड्या वेळान कंदील लांब लांब जावक लागलो. ते इतके भियाले कि पाटाच्या पाणी लावणा अर्धवट सोडून ते घराकडे इले. भियाल्यामुळे आणि थंडीमुळे तेंका हुडहुडी भरली आणि तापव इलो .

दुसऱ्या दिसाक चपला एक आमच्या बागात तर दुसरा ओहोळाच्या पलीकडे अशी मिळाली. कंदील बागात पडलेलो गावलो.असा सगळा त्येनी आमका सांगल्यावर  आम्ही आमच्याच बागात आठ दिवसतरी फिरकाक नाय. दिवसा-ढवल्यापण भीती वाटाक लागली.

असे हे आमचे वाशाडी मामा बरेच वर्षा आमच्याकडे होते. नंतर माका वाटता शीक पडले म्हणान ते गेले असतील पुढे त्यांचा काय झाला काय कळाक नाय. तो काळ असो होतो, मोठ्यांका प्रश्न काय इचारतलय? त्वांड वर करून बोलाची सोय त्या येळाक नाय होती.

तर असे हे माझ्या स्मरणातले ‘वाशाडीमामा’.

No comments:

Post a Comment